Saturday, June 22, 2019

"ग्रामसुधारणेची पंचसूत्री" -वसंतरावजी नाईक साहेब (माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) १४ ऑगस्ट १९७२ रोजी २६ व्या स्वातंत्र्यदिनाप्रसंगी आकाशवाणी केंद्रावरून व्यक्त केलेले मनोगत..


                 "ग्रामसुधारणेची पंचसूत्री"     

-वसंतरावजी नाईक साहेब(मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)

  (१४ ऑगस्ट १९७२ रोजी २६ व्या स्वातंत्र्यदिनाप्रसंगी आकाशवाणी केंद्रावरून व्यक्त केलेले मनोगत )

                                      संकलन- प्रा.दिनेश सेवा राठोड 

  आपला देश स्वतंत्र होऊन या वर्षी पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत . सुमारे दीडशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या देशातील थोर नेत्यांचे आपल्याला मार्गदर्शन मिळाले. अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला . स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लाखो लोकांनी आपापल्या परीने प्रयत्न केले , त्याग केला . ज्यांच्या असीम त्यागाने या देशाला स्वातंत्र्य लाभले त्यांच्यापैकी जे आज आमच्यात नाहीत त्यांना श्रद्वांजली अर्पण करणे व जे आमच्यात आहेत त्यांना मानाचा मुजरा करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे.   
   स्वातंत्र्यप्राप्तीनंतर साहजिकच राष्ट्रविकासाच्या योजना आपल्याला हाती घ्याव्या लागल्या. त्यासाठी पंडित जवाहरलालजींचे मार्गदर्शन आपल्याला लाभले. देशात नियोजनाचे युग सुरू झाले . अनेक खेड्यांतून नवीन नवीन कामे उभी राहिलीत. गावक - यांनी या कामांसाठी सहकार्य दिले. शासनाने देखील आपली जबाबदारी उचलली. ज्या खेड्यात स्वातंत्र्यपूर्व काळात निराशा , दारिद्रय , रोगराई आणि अज्ञान यानी थैमान घातले होते तेथे आता काही तरी नवीन होऊ शकते असा आत्मविश्वास निर्माण झाला. ग्रामीण जीवनाचे चित्र काहीसे बदलले, तरी पण अपेक्षित प्रमाणात खेड्यांची उन्नती अजून झालेली नाही. देश सुखी आणि समृद्ध व्हावयाचा असेल तर खेडी सुखी आणि समृद्ध झाली पाहिजेत. देशातील जनता सुखी व्हावयाची असेल तर खेड्यातील जनता सुखी झाली पाहिजे आणि म्हणून खेड्यातील जनता सुखी कशी होईल याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी खेड्यात विकासाच्या कामांना वेग द्यावा लागेल.  या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याच्या पंचविसाव्या वर्धापनदिनी प्रत्येक खेड्याने आपल्या गावाच्या कार्यक्रमाच्या सफलतेसाठी आपला हिस्सा उचलण्यास पुढे आले पाहिजे. अंगीकृत कार्यक्रम पार पाडण्याचा निर्धार केला पाहिजे, आज गावात अनेक उणिवा आहेत . त्या दूर करावयाच्या झाल्यास आपल्याला मुख्यत : पाच गोष्टीवर भर द्यावा लागेल . ग्रामसधारणेची ही पंचसूत्री आहे. पहिली गोष्ट म्हणजे गावाची रचना नीटनेटकी असली पाहिजे , गावातील कोणत्याही भागात  बैलगाडी जाईल अशा प्रकारे रस्ते रूंद व चांगल्या स्थितीत असले पाहिजेत, गावात डास , मो - या नाहीत ही परिस्थिती बदलली पाहिजे , सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमणे दूर केली पाहिजेत , घराची बांधणी आरोग्य वर्धक असली पाहिजे , असपास झाडे लावण्यास योग्य अशी एक हेक्टर जागा निवडून तेथे झाडे लावावीत व त्यांची जोपासना करावी , दुसरे म्हणजे पंचायत , सहकारी संस्था , वाचनालय , महिला मंडळ यासारख्या ग्रामविकासाला मदत  करणाऱ्या या सार्वजनिक संस्था गावात असल्या पाहिजेत. या संस्थात ग्राममवासीयांनी जास्तीत जास्त भाग घेऊन त्या कार्यक्षम ठेवाव्या , निरनिराळ्या  सरकारी योजना  यशस्वीपणे राबविल्या पाहिजेत . तिसरे म्हणजे वश , पंध , धर्म  , जात वावर अधारित माणसामाणसातील भेद नष्ट केले पाहिजेत , गावातून अस्पृश्यतेचे संपूर्ण  उच्चाटन झाले पाहिजे. जोपर्यत गावातील भेदाभेद उच निच भाव नष्ट होत नाहीत, तोपर्यंत खेड्यात सौख्य व समृद्धी येणार नाही आणि म्हणून समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक असणारी समतेची भावना वाढीस लावण्याच्या कामास सर्वात जास्त महत्त्व दिले पाहिजे , चौथे हणजे गावातील आरोग्य टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी  सतत प्रयत्न व्हावयास पाहिजे. पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे. गाव नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे . पाचवे म्हणजे आधुनिक पद्धतीने  शेती करून उत्पादन वाढविण्याच्या बाबतीत गाव प्रयत्नशील असावा. रोज नवीन लागणारे शास्त्रीय शोध , सुधारित बी - बियाणे व अवजारे , रोगप्रतिबंधक उपाय , रासायनिक खते व पाणी यांचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घेऊन उत्पादन वाढविण्याचा ध्यास गावक - यांनी घेतला पाहिजे. उत्पादन वाढविल्याशिवाय गावात आणि पर्यायाने देशात सुख व समृद्धी येणार नाही. म्हणून शेतक - यांनी आणि शेतमजुरानो उत्पादनवाडीचा कार्यक्रम तयार करून तो अमलात आणावा. 
 याही वर्षी पावसाच्या अवकृपेमुळे खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली , तो भरून काढण्याकरिता पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून रब्बी पिक अधिक प्रमाणावर घेण्याचा कार्यक्रम आता आपण तयार करावा. दुष्काळाचा सुकाळ करण्याची जिद्द ठेवून रब्बी हंगामातील उत्पादन वाढवावे.
   हा कार्यक्रम प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी सर्व गावक - यांनी आपले भेद विसरून  ग्रामसफाईसाठी दिनांक १४ ऑगस्ट रोजी एकत्र यावे व साफसफाई करावी . याच दिवशी गावक - यांची एक सभा व्हावी. या सभेत गावात जे लोक बेघर  असतील किंवा ज्यांची घरे फारच लहान असतील त्यांना स्वातंत्र्याच्या पंचविसाव्या वर्धापन वर्षात निदान राहण्यायोग्य असा निवारा मिळावा या दृष्टीने विचार व्हावा. सभेत ज्यांना घराची आवश्यकता आहे अशांची यादी तयार करावी. व त्यासाठी एकंदर जागा किती लागेल याचा अंदाज घ्यावा. तसेच ही जागा कुठे उपलब्ध होऊ शकेल ते पण पाहावे. हुवी असलेली जमीन सरकारी किंवा ग्रामपंचायतीची असल्यास ती मोफत उपलब्ध होईल व जमीन खासगी मालकीची असल्यास सामोपचाराने त्याही जमिनीचा ताबा ताबडतोब मिळेल अशी व्यवस्था करावी.  त्या जमिनीची किंमत सरकार देईल. गरीब लोकांची घरे बांधण्याच्या  दृष्टीने काही प्रमाणात सरकारी मदत मिळण्याबाबतची योजना लवकरच  जाहीर करण्यात येईल. 
   १४ ऑगस्टच्या मध्यरात्री ग्रामस्थांनी सर्व प्रकारचे भेदाभेद विसरून राष्ट्राशी एकनिष्ठ राहण्याची व प्रयत्नांची पराकाष्ठा करून देश सुखी, समृद व बलशाली बनविण्याची शपथ घ्यावी. शपथेचा नमुना सर्व गावांना व संस्थांना पाठविण्यात आला आहे . वर्तमानपत्रांतूनही तो प्रसिद्ध झाला असेल.
   १५ ऑगस्ट रोजी सकाळी उत्साहाच्या नवीन वातावरणात ध्वजवंदनाचे व प्रभातफेरीचे कार्यक्रम आयोजित करावेत. त्याच दिवशी सर्व गावक - यांनी एकत्र येऊन आपला गाव सुधारण्याचा एक कार्यक्रम निश्चित करावा दुपारी सर्व गावक - यांनी सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करावा. त्यासाठी गावातील सर्वांनी आपला शिधा एकत्र करावा. सर्व जाती धमांच्या लोकांनी सहभोजनाच्या निरनिराळ्या कामात भाग घ्यावा. या कार्यक्रमादारे सहजीवनाची व समानतेची भावना वाढीस लावावी आणि ती नेहमोकरिता टिकून राहील याची काळजी घ्यावी. 
  गाव आदर्श बनविण्यात सरकारी कर्मचारी  त आवश्यक ती मदत करतीलच  पण बुद्धीमतांनी आणि विद्याथ्यांनी जवळपासचे एखादे खेडे निवडून ते आदर्श बनविण्याचा संकल्प करून काम केल्यास काही अंशी सामाजिक ऋण परतफेड ते
करू शकतीलच शिवाय राष्ट्रविकासाच्या महान कार्यास हातभार लावण्याचे श्रेयही त्यांना  मिळेल. 
  हा कार्य पार पाडण्यासाठी जेथे जेथे शासनाची, जिल्हा परिषदेची किंवा पंचायत समितीची मदत आवश्यक असेल तेथे तेथे ती नियमानुसार आणि योजनेनुसार हमखास  मिळेल एवढे आश्वासन मी शासनातर्फे देऊ इच्छितो . 
   ग्रामविकासाच्या या विधायक कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रत्येक विकास गटातील दोन आदर्श खेडयांना वर्षअखेर शासनातर्फे बक्षिसे देण्यात येतील. पहिले बक्षीस साडेसात हजार रुपयांचे आणि दुसरे पाच हजार रुपयांचे राहील. 
  या विधायक स्पर्धेत सर्व गावांनी भाग घेऊन आपापले गाव आदर्श बनविण्याचा दृढ संकल्प केला पाहिजे. या संकल्पसिद्धीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, देशाने माझ्यासाठी काय केले हे न पाहता देशासाठी मी काय केले याचे समाधानकारक उत्तर आपल्यापैकी प्रत्येकाला देता येईल असे राष्ट्रकार्य पुढील एका वर्षात आपण केले पाहिजे. गाव महान बनला तरच देश महान बनणार आहे हे लक्षात ठेवून स्वातंत्र्याच्या पंचविसाव्या वर्धापन वर्षात महाराष्ट्रातील सर्व गावे आदर्श अनविण्याच्या महत्त्वाच्या कामात आपण सर्वांनी हातभार लावला पाहिजे. मला आशा आहे की, आपण सर्व जण गावे आदर्श बनविण्यास झटू व विकासाच्या आघाडीवर राहण्याची महाराष्ट्राची परंपरा याही बाबतीत कायम ठेवू . 
      
    (संकलक- हे साहित्यिक असून वसंतरावजी नाईक राष्ट्रीय बंजारा समाज भूषण व राष्ट्ररत्न पुरस्काराने पुरस्कृत आहे)
  profdineshrathod@gmail.com         www.profdineshrathod.blogspot.com
           Cell- +91-9404372756 

स्रोत- "आवाहन"- वसंतरावजी नाईक (निवडक भाषने) पारिजात प्रकाशन


"गरिबी हटविण्याचे महाराष्ट्रात सुरू झालेले नवीन क्रांतिपर्व" - वसंतरावजी नाईक

"गरिबी हटविण्याचे महाराष्ट्रात सुरू झालेले नवीन  क्रांतिपर्व"
                       - वसंतरावजी नाईक साहेब                 

 ( महाराष्ट्र दिन १ मे १९७२ , मुंबई , आकाशवाणी वरून दिलेले भाषण)


    1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि महाराष्ट्रीयन जनतेचे एक भाषिक राज्याचे स्वप्न साकार झाले. महाराष्ट्रातील लोकांच्या इच्छा-आकांक्षांना आणि कर्तृत्वाला नवीन पालवी फुटली. स्वककृत्वाने नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण कंकन बांधले. भूकंप वादळे पूर दुष्काळ आणि परकीय आक्रमणे यासारख्या नैसर्गिक व राष्ट्रीयआपत्तींना तोंड देऊनही राज्याने एका तपाच्या काळात विकासाच्या सर्व क्षेत्रात भरीव प्रगती करून समाजावर आधारित समृद्धीचा पाया घातला आहे. प्रगतीचा हा इतका मजबूत आहे की समृद्धीचे आणि सामाजिक संमृद्धीचे  सुंदर व भव्य मंदिर यावर उभारता येईल. 
  नुकत्याच भारतातील इतर राज्‍यात आणि महाराष्ट्रात राज्य विधानसभेच्या निवडणुका अत्यंत शांततेने आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या यामुळे लोकशाही ही भारतीय जनतेची जीवनपद्धती बनली आहे. याची पुन्हा सर्वांना एकदा प्रचिती आली. आपले प्रतिनिधी निवडून देताना महाराष्ट्रातील जनतेने जी शिस्त, शांतता आणि समजुतदारपणा दाखवला याबद्दल त्यांचे अभिनंदन करून माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे मी माझे प्रथम कर्तव्य समजतो.
    गर्ववर्षात राज्य नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन मोठमोठ्या गोष्टींना तोंड द्यावे लागले.  गेल्या डिसेंबर मध्ये पाकिस्तानने भारत हल्ला केला.  मानव स्वातंत्र्य, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता या महान तत्त्वांचा आणि भारतचा सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय एकता त्यांच्या संरक्षणासाठी आपण हे आव्हान स्वीकारले आहे.  पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत आसेतुहिमाचल एक झाला आणि आक्रमणाचा प्रतिकार उभा ठाकले.  आमच्या शूर जवानांनी पराक्रम केला आहे, केवळ चौदा दिवसांत पाकिस्तानवर अपूर्व विजय संपादन केले.  या विजयामुळे आमच्या तत्त्वनिष्ठेची पुन्हा एकदा चाचणी केली गेली आणि भारताची शान आणि मानसशाही उंचावली.  मला सांगायला अभिमान वाटतो की, संकटाशी सामना करण्यासाठी आघाडीवर राहण्याची आपली परंपरा महाराष्ट्राने याही वेळी राखली. जनतेने सर्व प्रकारे झळ सोसून , युद्ध प्रयत्नातला साथ दिली. आता युद्ध थांबले असले यी झळ मात्र आपल्याला दीर्घकाळ सोसावी लागणार आहे . यात अनेक जवानांना वीरगती प्राप्त झाली तर अनेक सैनिक  लढाईत अपंग बनले . त्यांच्या याराठी शासनाने जवान कल्याणाच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत.
  गतवर्षी पावसाच्या अभावी खरीप व रब्बी पिके बुडाल्यामुळे लागोपाठ दुस - या वर्षी  राज्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली . राज्यात वीस जिल्ह्यातील  सुमारे पंधरा हजार खेड्यांना दुष्काळग्रस्त परिस्थितीने ग्रासले . पण याही वेळी संकटावर मात करण्याच्या जिद्दीने शासन व जनता यांनी धैर्याने आणि कल्पकतेने टंचाईग्रस्त परिस्थितीशी यशस्वी रामना केला . दुष्काळग्रस्त भागातील सर्व गरजू लोकांना काम देण्यात आले . गेल्या फेब्रुवारीपर्यंत या कामावर सुमारे चाळीस कोटी रुपये खर्च  करावे लागले. यावरून टंचाईच्या या  प्रचंड कामांची कल्पना येईल .
     विशिष्ट वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक अशी खास यंत्रणा गेल्या वर्षी  उभी करण्यात आली . हातमाग विणकराचे प्रश्न सोडविण्यासाठी हातमाग संचालनालय , ऊस शेतक - यांच्या प्रश्नासाठी साखर संचालनालय आणि आदिवासींच्या प्रश्नांसाठी आदिवासी विकास महामंळाची स्थापना या दृष्टीने महत्त्वाची घटना होत . याशिवाय दुध व्यवसायाचा विकास करण्यासाठी खास योजना राबविण्यात येणार आहे.
  आणखी काही गोष्टीचा आज उल्लेख  करणे समयोचित ठरेल. महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षाशी सीमा प्रश्न निगडित आहे . सत्र निवडणुकानंतर म्हेसुरमध्येही आता लोकनियुक्त सरकार अधिकारवर आले आहे . यास्तव केंद्र  सरकारने यापूर्वीच हाती घेतलेला महाराष्ट्र - म्हैसुर सीमा प्रश्न लवकरच  निकालात निघेल अशी अपेक्षा आहे.
     मराठवाड्याची भूमी सुपीक आहे . नवनवीन  शास्त्रीय शोध लावून तेथील कृषी उत्पादन वाढण्याला मोठा वाव आहे . यामुळे सुमारे तीन वर्षांपूत , मराठवाड्यात कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता . हे कृषी विद्यापीठ दहा वर्षांनी स्थापन कावयाचे होते. पण तो कालावधी कमी होऊन येत्या जूनपासून परभणी कृषी विद्यापीठ सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत . या विद्यापीठामुळे मराठवाड्याच्या कृषी औद्योगिक विकासाला मोठा हातभार लागेल अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत शासनाने केलेल्या कार्यात जनतेने सक्रिय सहकार्य दिले . यापुढेही त्यांच्या आकांक्षेशी समरस होऊन आम्ही कार्य करू हा आमच्यावरील विश्वास जनतेने पुन्हा व्यक्त केला आहे . या जनतेच्या आकांक्षांशी एकरूप झालेले श्रीमती इंदिरा गांधींचे नेतृत्व आम्हाला लाभलेले आहे . ' गरिबी हटाव ' हे आमचे ध्येय असून , ते साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्व आहे . जनतेचे दारिद्र्य दूर करून , राज्यातील मागासलेल्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अधिक प्रमाणात सामाजिक न्याय मिळावा व त्यांची आर्थिक उन्नती झपाट्याने व्हावी यासाठी शासनाने एक सर्वव्यापी पंधरा कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे . या कार्यक्रमात जनतेच्या इच्छा - आकांक्षांचे प्रतिबिंब उमटले आहे . हा कार्यक्रम तातडीने अमलात आणण्यासाठी लागणारा पैसा अग्रहक्काने उपलब्ध करून देण्यात येईल . त्याचबरोबर अन्य विकास कार्याचीही वेगाने अंमलबजावणी करावयाची आहे . यासाठी जरूर तर उत्पन्नाची नवीन साधने शोधावी लागतील , कर आकारणी कमी व्हावयाची असल्यास , अल्पबचतीत अधिकाधिक गुंतवणूक झाली पाहिजे . गेल्या वर्षी जनतेने अल्पबचत मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला ही समाधानाची गोष्ट आहे . अल्पबचतीत अधिक पैसा गुंतवून आणि कराच्या रूपाने पडणारा बोजा स्वीकारून , गरिबी हटविण्याच्या कार्यास आपल्याला हातभार लावावा लागणार आहे . पंधरा कलमी कार्यक्रमातील ' मागेल त्याला काम ' हा कार्यक्रम उद्यापासून अमलात येत आहे तर कपाशीची एकाधिकार पद्वतीने खरेदी आणि कापडधंद्यांच्या पुनर्रचनेचा कार्यक्रमही याच हंगामापासून सुरू होत आहे . मुंबईतील झोपडपट्टया सुधारण्याचे कार्य १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे . मुंबई , पुणे , नागपूर , सोलापूर , औरंगाबाद वगैरे ठिकाणी यावर्षी जवळजवळ सहा कोटी रुपये या बाबतीत खर्च होणार आहेत . पंधरा कलमी कार्यक्रमातील प्रत्येक गोष्टी तातडीने पूर्ण करण्याचा शासनाचा निर्धार आहे . 
   समाजवाद आणि सामाजिक न्यायावर आधारित सध्द समाज निर्माण करणे , आपले अंतिम ध्येय आहे . यापुढे स्वावलंबन हा आपला परवलीचा शब्द आहे . यासाठी सर्व उपलब्ध साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन, आणि मानवी बुद्विमत्ता व कर्तृत्व पणाला लावून उत्पादन वाढविणे आणि वाढते संपत्तीचे न्याय्य वाटप होणे आवश्यक आहे . तसे केल्यानेच समाजवादवर आधार समृद्वीचे मंदिर आपण बांधू शकू . आपणच या मंदिराचे शिल्पकार आहोत . शिक्षण गुणवत्ता वाढवून आपल्याला नव्या युगातील प्रगतीच्या नव्या वाटांचे , नवनव्या  शास्त्रीय शोधांचे ज्ञान करुन घेऊन , कर्तृत्व व पुरुषार्थ जागृत करणे आवश्यक आहे. 
खरे म्हणजे माणसातील कर्तृत्व जागृत करून त्याच्यातील पुरूषार्थ चेतविणे हे विकासाचे मूळ कार्य आहे . महाराष्ट्र जागृत व्हावा यासाठी दहा वर्षांपूर्वी आपण जिल्हा परिषदा , पंचायत समित्या स्थापन केल्या . या काळात त्यांनी उत्कृष्ट कार्य केले . नैसर्गिक आणि राष्ट्रीय संकटांच्या प्रत्येक हाकेला त्यांनी ओ दिली . संकटावर मात करण्याच्या शासकीय प्रयत्नांना जिल्हा परिषदा आणि पंचायत सचिन निश्चयाने साथ दिली . अनेक शेतक - यांना उत्पादनाचे जुने उच्चांक मोडले . नवीन  प्रस्थापित केले . या पुरूषार्थात दुष्काळाचा सुकाळ करण्याची क्षमता आहे . महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती आहे . महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचे कर्तृत्व पुरुषार्थ जागृत करून आणि स्थानिक नेतृत्वाची आणि कर्तृत्वाची सांगड घातून गरिबी हटविण्याचे महाराष्ट्रात सुरू झालेले नवीन  क्रांतिपर्व यशस्वी करण्यास महाराष्ट्र दिनाच्या मंगल दिनी आपण कटिबद्ध होऊ या.
     
                             शब्दांकन- दिनेश सेवा राठोड 
                 कोहळा तांडा ता.दारव्हा जि.यवतमाळ
        www.profdineshrathod.blogspot.com
                     profdineshrathod@gmail.com
                          Cell- +91-9404372756 

स्रोत - वसंतरावजी नाईक - आवाहन ( Selected Speeches) पारीजात प्रकाशन 


World Banjara Day

Mr. D. Rama Naik took the historic initiative to organize "World Roma-Banjara Day" in India. Compiled by-  Dr. Dinesh Sewa...