Saturday, April 2, 2022

भिमणीपुत्र

*वाढदिवस विशेष लेख*
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐


आदरणीय भिमणीपुत्र मोहन गणुजी नाईकसाहेब यांचा आज वाढदिवस.

*मला भेटलेला पहिला लेखक--मा.भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेब* 
------------------------------------------------------------

*✍️याडीकार पंजाब चव्हाण,पुसद 95 52 30 27 97*

===============================
कवी सुरेश राठोड च्या या दोन ओळी

 *भिमणीपुत्र ज्यांचे नाव*
*साहित्यक्षेत्राचे गांव*
*प्रणाम घ्यावा रावं*
 *विचार पुत्राचा!!*

 माझे असे नशीब बलवत्तर की माझ्या लेखनाच्या सुरुवातीलाच मला गोर बंजारा समाजातील काही लेखक भेटले. ज्यांनी पहिल्या भेटीतच मला साहित्याची ओळख करून दिली. मित्र मानले. त्यापैकी एक म्हणजे *माननीय भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेब* तसे ते मला भेटलेले पहिले आंतरराष्ट्रीय गोर विचारवंत, प्रसिद्ध साहित्यिक, लेखक ,कवी मनाचे ज्यांच्या मुळे  माझे लेखन सुरू झाले. ते पुढे माझे लेखन गुरू झाले आहे.
 मी भंडारा जिल्ह्यातून पुसदला  1994 मध्ये बदलून आलो. माननीय शंकरराव राठोड साहेब बामसेफ कार्यकर्त्यै सोबत महाराष्ट्र बंजारा कर्मचारी सेवा संस्थेमध्ये यवतमाळ जिल्हा सचिव म्हणून काम करू लागलो .वाचनाची आवड होतीच. वाचता-वाचता लेखनाची आवड निर्माण झाली .
आणि *महानायक वसंतराव नाईक साहेब यांच्यावर पहिला लेख लिहिला तशातच *गोरबंजारा साहित्य संमेलनाचा विडा उमरखेडचे देवीदास मुडे काका यांनी उचलला होता* .
या संमेलनाची मूळ कल्पना माननीय भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेबांची होती. भिमणीपुत्र 
मोहन नाईक साहेबच या संमेलनाचे दिग्दर्शक,डायरेक्टर होते. उमरखेडला सदर साहित्य संमेलनाचे सभेसाठी गेलो असता. माननीय भिमणीपुत्र  मा. देवीदास मुडे काकाच्यां घरी हजर होते. मी त्यांचे चरणस्पर्श 🙏🙏केले. आताही कोणीही वरिष्ठ मला दिसले की मी त्यांचे चरण स्पर्श करतो. ही सवय माझ्या वडिलांनी मला लावून दिली होती. चरणस्पर्श  झाल्यानंतर माझी ओळख देविदास मुडे काका,आणि माझे मोठे बंधु नथू गोपा चव्हाण यांनी करून दिली .
भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेब यांनी माजी आस्थेने चौकशी केली .थोड्याच वेळात त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे जवळकीचे नाते जुळले .मी त्यावेळी छोटे-छोटे लेख लिहित होतो .त्यात अनुकरणाचा भाग होता. पण सातत्य नव्हते .माननीय भिमणीपुत्र मोहन नाईक साहेबांनी माझ्याशी चर्चा केल्यावर त्यांना माझ्यात एक साहित्यिक दडून बसला आहे. असे कदाचित जाणीव झाल्यामुळेच त्यांनी होऊ घातलेल्या उमरखेड येथील पहिले गोरबंजारा साहित्य संमेलनात रीतीरिवाजाप्रमाणे पुस्तक प्रकाशन करण्यासाठी पंजाब ने एक पुस्तक लिहावे अशी सभेत घोषणा केली .मी एकदमच घाबरलो. मला काहीच सुचत नव्हते .शेवटी हा.. हुं! करून मी होकार दिला. आणि विषय निवडला माझ्या जीवनात मला उंच शिखरापर्यंत नेणाऱ्या माझ्या सुंदल याडी विषयी लिहिण्याचे ठरले. असे लिहिण्यासाठी अजून पर्यंत तरी कोणी मला सांगितले नव्हते. मला नवी उभारी देणारा तो अनुभव होता. या आत्मकथनाने माझी ओळख भारतात सर्व दूर होईल याची कल्पना त्या वेळी मला आली नव्हती. पण माननीय भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेबांना कदाचित ती आली असेल ? मी उमरखेड वरून निघताना आनंदित होतो .पुढे मला कळले की नवीन लेखकांना मार्गदर्शन करण्याचा त्यांना लेखनासाठी प्रोत्साहन देण्याचा माननीय भिमणीपुत्र  मोहन नाईक साहेबांचा स्थायीभाव होता .त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक नवलेखकांना त्यांनी मदत केली होती. एवढेच नाही तर केवळ कोणतेही लिखाण करून चालत नाही .तर समाज परिवर्तनाचे लिखाण करून समाज सुधारण्याचे प्रयत्न प्रत्येक लेखकाने आपल्या लेखणीतून करावे असे त्यांचे ठाम मत 
 होते . पाठीवरून मायेचा हात फिरवून त्यांना माझ्या लेखनास मार्गदर्शन केले होते. त्यानंतर अनेक मित्राकडून त्यांच्या विषयी खूप माहिती मिळाली. आणि त्यातून त्यांच्या बद्दल एक विशेष आकर्षण वाढत गेले .त्यांचे माहूर तालुक्यातील चिंचखेड हे गाव .
शालेय जीवनापासूनच त्यांनी लेखनास सुरुवात केली होती .त्यांच्या वैचारिक लिखाण हे साहित्य क्षेत्रातच नव्हे तर मराठी साहित्य क्षेत्रात धुमाकूळ घालत होते .एवढेच नव्हे तर नसाबी (अंक) या लेखनाचे परिवर्तनवादी साहित्यिक यांनी तोंडभरून कौतुक केले .त्यानंतर त्यांचा गोरमाटी संस्कृती आणि संकेत चे प्रकाशन झाले म्हणून कवी सुरेश लिहतात.

*म्हणुन गोरगणाची संस्कृती*
*हीच खरी आदिम संस्कृती*
*उदाहरण सुकल्लडी चे वरती*
 *कथीले भिमणीपुत्राने !!*

नंतर नाईकसाहेब कविता कडे वळले त्यांनी केसुला नावाचा मराठी कविता संग्रह काढला. तेही खूपच गाजले. त्यानंतर त्यांचा तुकारी( सांस्कृतिक सेतू )आणि क्रांतिसिंह सेवादास तोडावाळो सन 2012 मध्ये प्रकाशित झाले. क्रांतिसिंह सेवादास तोडावाळो लिखाणाबाबत काही ठिकाणी जुजबी वाद झाले. पण थोड्याच दिवसात ते निवळले.
क्रांतिसिंह सेवादास तोडावाळो लिहिण्यामागचा हेतू हाच की गोर समाजाचा  इतिहास तमाम गोरबंजारा समाजाला माहीत व्हावा तेवढेच.?

 *बापू भिमणीपुत्राचा सायास* *वाचण्याचा करावा प्रवास*
*क्रांतिसिंह तोडावाळो खास*
 *अर्जी कवी सुरेश !!*

सन 2017 मध्ये मारोणी पुस्तक प्रकाशित झाले

*मारोणी हि गोरबोली शब्द*
*सखि या अर्थानेच सिद्ध*
*गोरगणातआहे प्रसिद्ध*
 *मोखिक साहित्यात !!*

आणि गोरपान हे पुस्तक प्रकाशित झाले विशेष बाब अशी की

 *गोरपानचे इंग्रजी रुपांतर  आंतरराष्ट्रीय इंग्रजी समीक्षक प्राध्यापक डॉक्टर दिनेश सेवा राठोड मलकापूर यांनी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर हे पुस्तक पोचून एक नवी क्रांती केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणारे हे गोर बंजारा समाजातील प्रथम पुस्तक आहे* त्याबद्दल प्राध्यापक दिनेश सेवा राठोड यांचे मनःपूर्वक अभिनंदन 👍👍.

*मने दिनेश बापूंचं खरे शिलेदार* *गोरगणला दिला त्यांनी आधार*
*लेखन केले खास बहारदार*
 *गोरपानाचे!!*

*म्हणूनच प्राध्यापक दिनेश म्हणतो त्यांना गडकरी*
 *लिओ टाल स्टॉय ,गारगी ते काय करी*
* *विलियम्स शेक्सपियर ची उपमा भारी*
 *शोभे बापू भिमणीपुत्रला !!*

प्रचंड लिखाण सुरु असतानाच माननीय भिमणीपुत्र मोहन नाईक साहेब आजारी पडले. त्या आजारामधुन  सहीसलामत बाहेर आल्यानंतर पुन्हा लिखाणाकडे वळले .प्रा. रवींद्र. बी. राठोड यांनी संपादन केलेला भिमणीपुत्र लिखित वाते मूंगा मोलरी हा मार्च 2018 मधील पुस्तकाने प्रचंड गाजावाजा केला .

*प्राध्यापक रवींद्र राठोड*
 *माणूस फार गोड*
*पत्र लिहिला आजोड*
*बापू भिमणीपुत्रास!!*


 *प्राध्यापक माणिक राठोड यांच्या मते*
 *काका भिमणीपुत्र भाग्यविधाते* *पुतण्याचेही आहे अतूट नाते*
 *गोर कुळीला उद्धरण्या*

चांदा जपजोर, चांदापरेर डोकरीर साकी , सुकल्लडी, मेलिया गोर याडी रो ढावलो हे आणि इतर प्रकरण प्रचंड गाजले.  त्यानंतर सन 2020 मध्ये लावण पिवशी, गोरबंजाराचे प्रतिभावंत कवी सुरेश  राठोड काटोल यांचे काव्यरूपी गेय संवाद आणि एडवोकेट चेतनकुमार नायक यांनी संपादित केलेला वाते मूंगा मोलरी चे प्रकाशन झाले. असे तीन पुस्तकाचे एकाच वेळी ऑनलाइन प्रकाशन सोहळा पार पडला .वाते मुंगा मोलरी यामुळे साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली. लावाण पिवशी आणि गेय संवाद या पुस्तकावर मला समीक्षा करण्याची संधी मिळाली .खरंतर मी भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेब यांचा चेला त्यांच्या पुस्तकावर समीक्षा करण्याची माझी पातळी नव्हती. पण माननीय नाईकसाहेबांनी मला समीक्षा करण्यास भाग पाडले. आणि सदर समीक्षेचे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रचंड स्वागत झाले .त्यामुळे माझी समीक्षक म्हणून आज दुसरी ओळख निर्माण झालेली आहे .त्याचे सर्व श्रेय आदरणीय भिमणीपुत्र नाईकसाहेबांना जाते.
दलित साहित्याचा प्रारंभीच्या काळात अनेक चर्चांमध्ये भाग घेऊन लिहून दलित साहित्य व साहित्यिक यांची नाईक साहेबांनी पाठराखण केली. त्यासाठी त्यांची पुरोगामी विचारांची बैठक कामी आली. दलित साहित्यात नवनवीन लेखक जसे उदयाला आले. तसेच गोरबंजारा साहित्यात नवनवीन लेखक उदयाला यायला पाहिजे. ही धडपड नाईकसाहेबांची होती. आज महाराष्ट्रात दीडशेच्या वर  गोर साहित्यात लेखक कवी साहित्यिक लिहित आहे ही  आदरणीय भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेबांची देणं आहे.

 *धन्य धन्य बापू भीमणीपुत्र*
*अनेक असती मानसपुत्र*
 *शाहीन ताई मानसकन्या मात्र*
*सांगे विचारपुत्र*

 उमरखेड येथील साहित्य क्षेत्रात आम्ही सोबत जोडलो. त्यानंतर अधून मधून भेटीगाठी व्हायच्या. त्यामुळे लेखण साहित्या बाबत चर्चा व्हायची. प्राध्यापक मोतीराज मामा, माननीय प्राचार्य ग. ह. राठोड सरांच्या सोबत चिंचखेड येथे भेटी झालेल्यां आहेत. माननीय भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेब यांनी याडी पुस्तकानंतर मला थेट मार्गदर्शन केले नाही. परंतु त्यांचे सुक्षम लक्ष माझ्या लिखाणावर असायचे भेटल्यावर बोलायचे. चर्चा व्हायच्या. माझ्या पहिल्या याडी पुस्तकासाठी त्यांचे मोलांचे सहकार्य लाभले. त्यांच्यामुळेच हे पुस्तक बाहेर आले. त्यांनी सुंदर अशी प्रस्तावना या पुस्तकाला लिहिलेली आहे .उमरखेड च्या सन 2003 च्या पहिले गोरबंजारा साहित्य संमेलनांमध्ये याडीचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. कारण ते त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात माझ्या याडी  पुस्तकावर भरभरून बोलले आणि भाषणाच्या शेवटी त्यांनी घोषणा केली *यानंतर पंजाब चव्हाण यांचे नाव केवळ पंजाब चव्हाण असणार नाही तर याडीकार पंजाब चव्हाण अशी ओळख  राहील असे जाहीर करताच सभागृहात टाळ्यांचा प्रचंड गडगडाट झाला* मला स्टेजवर बोलावून माझे नामकरण *याडीकार* म्हणून केले *आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात *याडीकार म्हणून जी माझी ओळख आहे ते केवळ माननीय भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेबांमुळे*   आधी  नाईक साहेबांची ओळख *नसाबीकार* म्हणून होती. त्यानंतर नाईकसाहेब राष्ट्रीय बंजारा परिषद महा संमेलनाचे सन 2011 मध्ये अध्यक्ष होते. पाचवे अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलन डोंबिवलीचे ते संमेलनाध्यक्ष झाले .आजही त्यांची तब्येत बरोबर नसतांनाही ते अनवाल  आणि काकडवादां या सदरातुन  रोज सकाळी वाचकांना भेटतात .*गोरबोलीला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांचे फार पूर्वीपासून प्रयत्न सुरू आहे .त्या पद्धतीने त्यांचे लिखाण आणि त्यांचा पत्रव्यवहार आजही सुरू आहे*

 म्हणून कवी सुरेश  राठोड आपल्या गेय संवाद मध्यें लिहितात.

*भिमणीपुत्रा सारिखे वरं*
 *लाभो गोरकुळीला फारं*
*तेव्हाच होईल उद्धारं*
*गोरबोलीचा!!*

त्यांचे आगामी आत्मकथन कडपो लवकरच साहित्यक्षेत्रात यावे .आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी सेवा बापू चरणी 🙏🙏प्रार्थना करतो आणि थांबतो !!

*या लेखात आलेल्या सर्व कवीता या प्रतिभावंत कवी सुरेश राठोड ‌कटोल-सिंगद यांच्या गेय संवाद पुस्तकतील आहेत*

आंतरराष्ट्रीय लेखकाची ओळख सर्वदूर होण्यासाठी आपण सदर पोस्ट जास्तीत जास्त लोकांना फारवड कराल अशी अपेक्षा करतो🙏🙏 !!

*जय सेवा ...🙏.जय वसंत ..🙏🙏..जय संविधान !!*

*एक गोर....नेक गोर*

  *✍️याडीकार पंजाब चव्हाण पुसद*             *मोबाईल नंबर 94 21 77 43 72*

भिमणीपुत्र

गोरबोलीन जागतिक दर्जाप पुचायवाळो गोरबोली अभ्यासक, साहित्यिक भिमणीपुत्र मोहन नायक

                      ... शब्दांकन...किशोर आत्माराम नायक
🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄
     आज जगेर पुटेप नाळी नाळी देशेम, प्रांतेम गोरबोली बोलेवाळ गोरमाटी वसरेच. हजारो सालेती आपणी बोलीन संबाळन आजेलग रकाड मेलेच. भक्कम सी बोलीभाषा लुप्त वेगी, वा वोर अस्तित्व नष्ट वेयेम जमा छ. काम्पुटर, मोबाईलेर जमानो आवगो जू बोलीभाषा जतन करणो कटीन वेगोच. लकणी लकेवाळ याडीबोलीन जतन करेर ऐवजी दुसरी भाषाम बोलणो लकणो येन अभिमानेर वात समजेन लगगेच. छच्यारून घर बोलेर वणा मराठी, हिंदी, इंग्रजी आसी नाळीनाळी भाषार वापर कररेच.गोरबोलीम बोलणो हलकेपणेर समजेलाग. लकणी लकन नोकरी, धंदेप लागेहुये गोर गोरबोलीतीच टाळो खायलाग. लारेर विस, पच्चीस सालेम गोरबोलीर बोलेवाळेर प्रमाण झपाटेती कयी वेयलागो. 

        आसे वकतेम गोरबोली बचायसारू मकते गोर वेराणू झटेलाग. गोर बोली टिकणो करन बोलेलाग, लकेलाग वोरयेती आयेवाळे काळेम गोरून गोरबोलीर मत्व कळेलागो. नवीपिडीर चेतना जागेलाग. " दूर थे जब डुंगर थे, आब हुई जाण पछाण , सगाती सगा मळगे ....." क जू वारसेक खोड, पालवा गोरबोलीम बोलेलाग लकेलाग. 

        गोरबोली र वात जनाबी निकळीय जना एक नाम आयेवाळी पिडीन सदा वाट वताळतो रीय उ मंजे... 
................................ भिमणीपुत्र मोहन नायक
       गोरबोलीन वजाळेम लान, जगेर कानाकोपराम पुचायेर काम ये वेराणूर हातेती घडतो आयोच. गोरबोली आजेताणी तांडेमच बोलतेते. हजारो सालेती हामार बाप-दादा, याडी-भेन वायार गीद, वाजणा, होळीर लेंगी, टेर,ढावलो, तीजेर गीद, सण तेवारेम बोलताणी टकान रकाड मेलीच. पण आयेवाळे समीयाम ओन जतन करणो घणो गरजेर छ. भिमणीपुत्र बापू याडीबोलीन जतन करेसारूच कोशीस कोणी किदो, तो गोरबोलीम जपरे जे भाषा सौंदर्येर सोजा लेन याडीबोली दनीयामाईर दुसरी भाषाऊती कती कमी छेई उ वजाळेम लायेर काम कररोच. 

        " गोरमाटी बोलीभाषा आणि संकेत " पुस्तक लकन गोरबोलीर शब्दसामर्थ , ओमाईर नाळीनाळी रस, अलंकारेर सोजा लेन गोरबोलीर वैभवशाली शब्दभांडार, ओर ताकद दकाळेर काम किदोच. 
   " वाते मुंगा मोलेरी" माई गीद , वाजणा, लेंगी, कसळात येमाईर शब्देशब्देर उकल, फोड करन दकाळमेलोच. आयेवाळी पिढीन गोरबोली कुणसी भाषाती कमी छेई तो इतर भाषापेक्षा समृद्ध छ. इ वात हुंडयांग लायेर काम भिमणीपुत्र करमेलोच.

   " गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन" ... इ पुस्तक लकन सिद्ध करणाको की गोरबोली व्याकरणेर डिलेती कतीच कमी छेनी. व्याकरणेर अभ्यासकेन दकाळ दिनो की, गोरबोलीम अलंकार, रस, भाषा सौंदर्य, म्हणी, वाक्प्रचार, समास, विभक्ती आसे जे बी घटक छ ओ अस्तित्वेम छ. गोरबोलीम लकेवाळेन, बोलेवाळेन, विचार मांडेवाळेन सदा वाट वतायेर कारया करतो आयेच.

     गोरबोलीन राजकीय भाषार दर्जा मळीचाय करन पंतप्रधान, राष्ट्रपती ताणू पत्रव्यवहार करतो आरोच. गोरबोली बदल ओंदूर जीवाळो दकान पडच. आज न आजेर दनेप गोरबोली न राजकीय दर्जा मळयीच. जना बी दर्जा सरकारेसामुती मळीर जना ओत पेलो नाम, पेलो हारद से भिमणीपुत्रेनच करीय. 
   " क्रांतिसिंह सेवादास तोडावाळो, मारोणी, गोरपान , नसाबी, लावण पिवसी, वाते मुंगा मोलेरी, काकडवांदा, अनवाल,थु: पेल आसी लकणीमाईती गोरबोलीन जीवतो रकाडेर काम करतो आयोच. आजेर समयेम लकेवाळ, बोलेवाळ भकम तयार वेगेच, से आचो लकरेच. जुने वातेर सोजा लेन वापरेम लारेच. आयेवाळे समीयाम गोरबोलीन नक्कीच आचे दन आय.

      आज नायक बापूर जलमदन... गोरबोलीम बोलेवाळो, लकेवाळो, जगेवाळो. शब्देशब्देर सोजा लेन ओर फोड करन दकाळेवाळो. येच वातेर विचार करन याडीकार, डॉ. सुभाष राठोड, गणेश करमठोट आसे घणे लोकूर केणो छ. भिमणीपुत्रेर जलमदन " गोरबोली भाषा दन" करन मनायेन चावच. दमाळ प्रकाशनेवाळ कामी बी लागगेच ओंदूर मनेकनती धन्यवाद. 
   आयेवाळे काळेम "२ एप्रिल" ई दन नक्कीच सारी दनीयाम " गोरबोली भाषा दन" करन मनायेम आर आस आसा करुचू.
   याडी सगळती भिमणीपुत्र बापू न वजी याडीबोलीन वजाळेम लायेर ताकद द... आस आरदास करुचू
............................... किशोर आत्माराम नायक
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

भिमणीपुत्र

🍀 गोर भाषाशास्त्र आणि साहित्याचा सामर्थ्यवान मेरूमणी भीमणीपुत्र 🍀
****************************************
✍️( c.): डाॅ.वसंत भा.राठोड, मांडवी किनवट. 
मो.नं. : 9420315409., 8411919665.
****************************************
              गोरबंजारा समाजात अनेक दिग्गज विर लढवय्ये, महान तपस्वी, त्यागी युग पुरूष, व्यापारी, लदेणीकार मैलो गणतीचा प्रवास करीत जन्मास आले नी नियत कालमानानुसार निजधामास गेले. त्या महान योध्यांच्या राहिल्या फक्त आठवणी. परंतू हयात असणा-यांच्याही आठवणीत रममाण होणे यथायोग्य गरजेचे वाटते. असेच गोर विचार,संस्कृती , चालीरिती, उत्सव, वाद्य, संगीत भाषा इत्यादी बाबीचे निष्णात निपुण जाणकार तुम्हा आम्हा मध्ये तेजस्वी सूर्याप्रमाणे चमकत आहेत. असे गोर भाषाशास्त्रज्ञ ,हाडाचे साहित्यिक भीमणीपुत्र हे होत. आज 02 एप्रिल त्यांच्या अभीष्टचिंतनाचा दिवस, त्या निमित्ताने केलेला लेखन प्रपंच. 
            वास्तविक पहाता गोरबंजारा समाजाच्या लिखित साहित्याला बहर सत्तरीच्या नंतर आलेली असल्याचे अभ्यासाअंती दिसून येते. त्या पूर्वी 1935 साली गोर बंजारा समाजाचे आद्य समाज सुधारक स्व. बळीराम हिरामण पाटील,मांडवीकर,ता.किनवट, यांनी " गोर बंजारा लोकांचा इतिहास " हा दुर्मिळ संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित केला. मूलतः हा ग्रंथच अनेक गोर बंजारा लेखकांच्या साहित्य विश्वाची नांदी ठरला. या मांडव्य रूषीच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या भूमीत, बळीराम पाटलांच्या साहित्य विश्वाच्या कुशित एक प्रतिभावंत साहित्यिक,लेखक जन्माला आला. त्यांचे नाव भीमणीपुत्र मोहन गणूजी नाईक,चिचखेला तांड्याचे नायक ,वडिल गणूजी नाईक व आई भीमणीबाई नाईक , यांच्या पोटी मराठवाड्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या चिंचखेड तांडा ता.किनवट,जि.नांदेड येथे त्यांचा जन्म दि. 02 एप्रिल 1950 रोजी झाला.
               वास्तविक पाहता त्यांच्या घराण्यांच्या कौटुंबिक परंपरेचा विस्तार फार मोठा आहे. गणूजी नाईकांचे सर्वात मोठे बंधु वसराम नाईक,त्यांच्या पाठचे गोमाजी नाईक , तिसऱ्या नंबरचे गणूजी नाईक व सर्वात लहान मनिराम नाईक अशा चार भावंडांचा एकत्रित संयुक्त परिवार होता. घरात बारा सालगडी, 300 एकर शेती, एक छकडा, पडदयाची डमनी गाडी, अंगणात भला मोठा उंचच्या उंच काठेवाडी घोडा, कौटुंबिक संरक्षणासाठी शासनाने दिलेली रायफल, संपूर्ण परिवार निर्वेसनी व श्रमजीवी होता. या संपूर्ण विस्तारीत कुटूंबाचे संचालन (कारभारपण)    गोमाजी नाईक हे करायचे.
             तत्कालीन परिस्थितीत संपूर्ण चिंचखेड परिसरात गोमाजी नाईकांचा फार मोठा दरारा आणि रूबाब होता. ते कमालीचे शिस्तबद्ध व न्यायप्रविष्ट होते. गावा, तांड्यावर त्यांची वैचारिक पक्कड जबरदस्त होती. आजही या घराण्याची शिस्त आणि न्यायप्रियता वाखणण्या जोगी आहे. तो वारसा मोहनरावाचे धाखटे बंधु श्री. बंडूसिंग गोमाजी नाईक (माजी जि.प.सदस्य, नांदेड) हे चालवितात. न्याय, निवाडा आजही अखंडितपणे चालूच असतो. संपूर्ण तांडा नी गाव व्यसन व तंटामुक्त आहे. आजही संपूर्ण गावात दारूबंदी आहे. याचे पूर्ण श्रेय नाईक घराण्याला जाते. अशा कुटूंब वत्सल घराण्यात भीमणीपुत्र मोहनरावांची जडण घडण झाली. 
            मोहनराव बालपणापासूनच तल्लख व चळवळ्या बुध्दीचा बालक होता. म्हणून मोठे बाबा गोमाजी नाईक त्यांना नेहमी सोबत घेऊन फिरायचे. या सर्व श्रमसंस्काराची छाप या बालकावर पडू लागली. सुरूवातीचे प्राथमिक शिक्षण तांड्यातील शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण मांडवी येथे व महाविद्यालयीन शिक्षण पुसद येथिल फूलसिंग नाईक महाविद्यालयात झाले. 
             त्यांना मुळातच अलौकिक कुशाग्रबुद्धिमत्ता लाभलेली असल्या कारणाने, हरहून्नरी  स्वभाव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. सरकारी नोकरीच्या अनेक संधी घरबसल्या दारापर्यंत आल्या त्या सर्व त्यांनी धुडकाऊन लावल्या. पोलीस विभागात फौजदार पदाचा काॅल आला , शिक्षक ,प्राध्यापकाची संधी घर बसल्या आली, या सर्व सरकारी नोकऱ्यांना त्यांनी दुर लोटले. वडिलांचे लाडके, आई भीमणीबाईचे अपार प्रेम, बारा औताची शेती, अनेक नोकर चाकर, गायी गुरे, रोज मजूरदारांचा राबता घरात होता. पंचक्रोशीत वडिल गणूजी नायकांचा आणि गोमाजी नायकांचा मोठा दरारा होता. जन्मताच श्रीमंतीचे वैभव त्यांना लाभले होते. अशा वैभवशाली घराण्यांची परंपरा मोहन तूला चालवायची आहे. तूला नौकरीची काय आवश्यकता ? असे मोठे वडिल गोमाजी नाईकांचे म्हणने म्हणजे आदेशच होते. 
                आई वडिलांची शिकवण ,नाईक घराण्यांची परंपरा शिरोधार्य मानून मोहनराव शेती कामाला लागले. अर्धांगिणी शेवंताबाई नाईक घराण्यांची कुलवधु म्हणून त्यांना लाभली, ती आज तागायत अखंडित आहे. या घराण्याच्या संसार, व्यवहारामध्ये शेवंताबाईचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले. त्यांच्या संसार वेलीला दोन  कन्यारत्न व दोन पुत्ररत्न फुला फळाला आली. थोरली मुलगी सौ. आराधनाताई तुळशीराम चव्हाण , जावई बापू उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे शिक्षक आहेत. दुसरे जावई साहेब कोल्हापूर येथे वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. मुलगी प्रा.सौ. भारतीताई अनिल मुडे ,ही सुध्दा शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. थोरले चिरंजीव ॲड.चेतन नाईक माहूर येथे वकीली व्यवसाय करतात व धाकटा कृषी पदवीचे शिक्षण घेऊन स्वतः वडिला बरोबर शेती कामाला लागला. आज सर्व नातवंड लथपथ त्यांच्या अंगा खांद्यावर खेळतांना, बागडतांना दिसतात. 
              मोहनरावांनी स्वतःला शेतीत ,मातीत गुंतून घेतले. पिक पाण्या सोबत त्यांनी आपले नाते जोडले. शेतात अंकुरलेली पिके, फळा फुलांनी लगडलेली पराटी, तुराटी रानातील रानगंध या सर्वांच्या रूणानुबंधात ते घट्ट बांधल्या गेले. या रानगंधातून शेतीच्या बांधातून गोर बंजारा समाजाचा सामर्थ्यावान शिलेदार ,मेरूमणी भाषाशास्त्रज्ञ उदयास आला त्यांचे नाव भीमणीपुत्र. 
              जन्मदात्रीचे नाव भीमणीबाई असल्या कारणाने आपल्या साहित्यिक लेखणीला त्यांनी भीमणीपुत्र हे नाव दिले. माझ्या लेखणी सोबत जन्मदात्रीचे नाव अखंडित राहावे हा त्यांचा उदात्त हेतु. 
              भीमणीपुत्राच्या लेखणीला बहर आली ती मांडवीच्या घराण्याने ,कारण मांडवी घराण्याशी साहित्यिक नाळ विद्यार्थी दशेपासूनच जोडल्या गेली होती. नंतरच्या काळात ती चांगली बहरली. त्या वेळेस त्यांना स्व. बळीरामजी पाटील यांचा सहवास लाभला. पाटील यांचे जेष्ठ पुत्र स्व. खासदार उत्तमरावजी राठोड व बंधुपुत्र स्व. मधुकरराव पाटील यांच्या कडून वाचन, लेखनाची आवड निर्माण झाली . त्या वेळेस मांडवीला " हिरा वाचनालय " ही एकमेव ग्रंथालय होती . काही दुर्मिळ पुस्तके ,ग्रंथ आणण्यासाठी ते मांडवीला जात असत. एकंदरित या अनमोल सहवासातून त्यांना वाचन लेखनाची प्रचंड आवड निर्माण झाली. 
               शेतीच्या बांधावर अर्धांगिणी शेवंताबाईच्या सहवासातून शब्दशिल्प लेखणीच्या माध्यमातून उमटत गेले नी साहित्य शिवार फुलत गेले. ती लेखणी आज तागायत एकात्तरी ओलांडून बहात्तरी सुरू झाली तरी अखंडित पणे वाहत्या धारेप्रमाणे नितळ ,निश्चल, निरामय चालू आहे. आजही तरूणांना लाजवेल अशी चपळायी व तेजःपुंज ,पाहता क्षणी नजरेत भरणारं असं मुखमंडल आहे. 
               त्यांचे घराणे मुळातच पुरोगामी विचाराचे, परिवर्तनवादी चळवळीचे मुख्य केंद्र होते. निजाम राजवटीशी दोन हात करणारे होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाच्या खंजेरीशी नाळ जोडणारे होते. या सर्व विचार सरणीणीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. यातूनच वेग वेगळ्या साहित्य लेखनाची सुरूवात झाली. 
                त्यांनी " गोरमाटी संस्कृती आणि संकेत " हे पहिले पुस्तक जन्मास घातले .त्यानंतर अनेक पुस्तके त्यांनी लिहिली त्यामध्ये दमाळ, तुकारी, क्रांतीसिंह तोडावाळो, मारोणी, केसूला, लावंण ,नसाबी, कडापो, गोरपान ईत्यादी अनेक वैचारिक पुस्तके साहित्याच्या रूपातून प्रकाशित झालेली आहेत . त्यांच्या साहित्य लेखनामध्ये साहित्याचे सर्वच प्रकार आढळतात. गोर कथा ,कविता, रितीकाव्य, गीतकाव्य, लडीगीत, मुक्तछंद काव्य, गोर केणावट, साक्तर ( गोर संस्कृतितील पुरातन गोष्टी) असे साहित्याचे अनेक प्रकार त्यांनी जोपासले. विद्रोही, संघर्षशील साहित्याची त्यांनी निर्मिती केली. 
             गोरबंजारा लोक साहित्यकार, भाषाशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी ख्याती मिळविली. तांडा संस्कृतीचे जीणे आणि जगणे त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडले. आपल्या प्रतिभाशाली लेखनाने अनेक गोर बंजारा लेखक, विद्वान, नव तरूण यांच्यावर छाप पाडली. त्यांच्या लेखन साहित्याचा आधार, संदर्भ घेऊन अनेक विद्वान पीएच. डी., एम. फिल. झाले. त्यांनी गोरबंजारा समाजावर चौरंगी लेखन करून साहित्य सामग्री, ग्रंथ, पुस्तके संशोधक, विद्वाना करीता स्वतःचे साहित्य उपलब्ध करून दिले. 
              बंजारा समाज मुळातच उत्सव प्रिय समाज आहे. राना वनात, तांडा संस्कृतीमध्ये राहून या समाजाने आपली संस्कृती, चाली रिती, तिज उत्सव, दसरा, दिवाळी, होळी, लेंगी गीत, लग्नगीते, ढावलो, साज ,श्रृंगार जोपासली आहे. या सर्व संस्कृती कला प्रकाराचे अवलोकन लेखकाने अतिशय जीव ओतून केले आहे. 
              त्यांचे" गोरपान " नावाचे पुस्तक प्रा.डाॅ. दिनेश सेवा राठोड यांनी इंग्रजी मध्ये रूपांतर करून साता समुद्रा पलिकडे पोहोचविले. या पुस्तकाला ख्यातकीर्त असा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला. युरोप  मध्ये रोमा जिप्सी बंजारा समाजात हा ग्रंथ मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला.देशातील वेग वेगळ्या सात भाषेत हे पुस्तक रूपांतरित होऊन प्रकाशित झाले आहे. आज घडीला दहा हजाराच्या वर याच्या प्रती विकल्या गेलेल्या आहेत. गोर संस्कृती ,साहित्याला श्रृंगार रसाच्या माध्यमातून सजविण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे. 
              बंजारा समाजातील पुरातन दुर्मिळ शब्द, संस्कृती, कला प्रकाराचे एक वेगळे सदर त्यांनी साहित्य रूपात " अनवाल "  आणि "वाते मुंगा मोलारी (MY SWAN SONGS) " या नावाखाली चालवित आहेत. वाते मुंगा मोलारी भाग एक हे संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले आहे.या ग्रंथाच्या संपादनाचे कार्य डाॅ. रवींद्र राठोड नागपूर, यांनी केले आहे. यामध्ये अश्मयुग, लोहयुग, ताम्रयुग अशा अनेक युगाचा अभ्यास करून, आपले लेखन कार्य हडप्पा ,मोहेनजोंदाडो, सिंधुघाटीची सभ्यता या पुरातन संस्कृती पर्यंत आणून सोडले आहे. या भाषाशास्त्रज्ञाने आपली साहित्य संपदा समाजापुढे आणण्याचा भीष्म प्रयत्न आणि साहस केला आहे. 
              त्यांच्या साहित्य चळवळीची एक शोकांतिका वजा कळवळा आहे की माझा समाज शिकला पाहिजे, वाचला पाहिजे, सुधरला पाहिजे, निर्वेसनी झाला पाहिजे. असा आर्त टाहो त्यांनी फोडला आहे. त्यांच्या विषयी एक गोष्ट मला आठवते, ही गोष्ट 2007 ची आहे. आमच्या कॉलेजच्या स्नेह संमेलना करीता आपण प्रमुख अतिथि म्हणून यावेत याचे निमंत्रण देण्या करीता मी आणि माझे मित्र बी. के. राठोड दोघे गेलो. आधीची काही विद्वान मंडळी बसलेली होती. त्यांनी आम्हा दोघांचे सहर्षवदनाने स्वागत केले. त्या प्रसंगी त्यांनी एक व्यथा आमच्यापुढे प्रकट केली, " लोक वाचनच करीत नाहीत, ही माझी सर्व पुस्तके ,साहित्याची तिजोरी, मी मेल्यावर माझ्या सरणावर रचून ठेवा व दया आग लाऊन. " येवढ्या महान लेखकाचे हे बोल ऐकून मी अर्धमेला झालो. आज आमची तरूण मंडळी वाचना पेक्षा नाचण्यात दंग आहे. त्यांची कपाटे ,आलमा-या विविध प्रकारची कापडं, चप्पल बुटांनी व ईतर वस्तूंनी खचाखच भरलेली आहेत. परंतू त्यामध्ये कुठे पुस्तकाला स्थान दिसत नाही. ही बाब समाज हिताच्या दृष्टिकोनातून हितावह वाटते व तमाम सर्व गोर बांधवांना विचार करावयास लावणारी आहे. 
             गोर बंजारा समाजाच्या परिषदा व चळवळी त्यांनी साहित्य रूपाने गाजविल्या. भारतातील पहिले गोरबंजारा परिवर्तनवादी साहित्य संमेलन उमरखेड , जि.यवतमाळ ,येथे दि.11 जानेवारी 2003 साली त्यांचे व्याही देवीदास मुडे गुरूजी उमरखेडकर यांनी भरविले. या ऐतिहासिक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा भीमणीपुत्र यांनी सांभाळली. त्याही वेळेस आपल्या अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषणाने जन समुदायास भूरळ घातली.  याच वेळेस " याडी " नावाचे आत्मकथन श्री. पंजाब चव्हाण पुसद, यांचे प्रकाशित केले. एका नवोदित लेखकाला उदयास आणले, त्यांना नाव लौकिक मिळवून दिले  याचे संपूर्ण श्रेय भीमणीपुत्रांना जाते .
              त्याचबरोबर या गोर भाषाशास्त्रज्ञाने साहित्य विश्वात आपले सोनेरी नाव गिरवत दि. 29 व 30 मार्च 2018 च्या डोंबिवली मुंबई, येथील साहित्य संमेलनात अमोघ ज्ञानशक्तिच्या सामर्थ्याने जनमानसावर , रसिक श्रोत्यांवर आपली छाप पाडली. तांडायातलं जगणं,वागणं ,बोलणं ,रित रिवाज, भाषा, संस्कृती, नृत्य, संगीत,पुरातन गुज गोष्टी , दुःख, दैन्य, कडापो या सर्व बाबतीचा  बारकाईने साहित्यात्मक अभ्यास करून त्याची शास्त्रशुध्द मांडणी त्यांनी केली. म्हणून ते गोरबंजारा भाषाशास्त्राचे महापंडित म्हणून लौकिकास पात्र ठरतात. 
              चिंचखेड तांड्यातील जगण्या वागण्याच्या रूढी, परंपरेलाच त्यांनी विद्यापीठ मानलं . ते नेहमी अभिमानाने सांगतात, " My Chinchkhela Tanda Is My Folklore University. " माय मातीची सेवा करत जीवनाची सायंकाळ गाठली. आपल्या तांड्याला गोर साहित्य, संस्कृतीचे विद्यापीठ म्हणून गौरव मिळवून दिले . म्हणून म्हणावेसे वाटते , " Bhamaniputra is a lion of the Gorbanjara literature " खऱ्याअर्थाने ते गोर साहित्य शास्त्राचे अधिनायक ठरतात किंबहुना ते आहेतच. 
              समाजातील कित्येक ज्ञानशाखांच्या संमेलनाचे  अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले. किनवट, मांडवी, यवतमाळ, उमरखेड, औरंगाबाद, नागपूर, मुंबई अशा ठिकाणी गोर साहित्याचा ठसा उमटविला. आजही जीवनाच्या सायंकाळी लेखन कार्य अखंडितपणे चालू आहे. खंगून गेलेल्या शरीराच्या कित्येक शस्त्रक्रिया झाल्या. त्यांचे जानेवारी 2020 ला  हरण्याचे फार मोठे ऑपरेशन नागपूर येथे झाले. त्या निमित्ताने त्यांना भेटावयास चिंचखेड येथे गेलो. त्याही वेळेस हा भाषाशास्त्रचा भिष्माचार्य  विस टाक्याचे भले मोठे ऑपरेशन होऊन सुध्दा आपल्या भाषाशास्त्राच्या अखंडित लेखन कार्याला लागले होते. याही आधी त्यांच्या वेग वेगळ्या सात शस्त्रक्रिया झाल्या. वय मावळतीकडे झुकलेले असतांना सुध्दा थरथरल्या हातात तिन फनाच्या काठीचा आधार, कानाला सदोदित कर्णयंत्र त्याशिवाय ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय काम  करीत नाहीत. चिंतनशील  स्वभाव त्यांना स्वस्थ व शांत बसू देत नाही. अहोरात्र गोरबंजारा साहित्याची व मायबोली भाषेची भक्ती आणि ध्यास या महान साहित्यिकांने जोपासले. मोठ्या प्रमाणावर गोर भाषाशास्त्राची श्रम साधना या साहित्य  सुपुत्रांने केली आहे. 
              गोरबोली भाषेची आणि भाषाशास्त्राची सेवा त्यांनी अखंडितपणे चालविली. जन्मदात्री आई बरोबरच गोरबोली भाषेला आई मानले. माझ्या गोरबोली भाषेला घटनात्मक राजभाषेचा दर्जा मिळावा,  विद्यापीठाच्या ज्ञानकक्षेत स्वतंत्र भाषा संकुल स्थापन व्हावे, याकरीता नामदार मंत्री महोदय संजयभाऊ राठोड यांच्या करवी शासनाकडे पाठपुरावा केला. अनेक ठराव व पत्रोच्चार शासन दरबारी करून भाषेला घटनात्मक दर्जा मिळवून देण्यास आग्रही भूमिका त्यांची राहिली. 
              त्यांच्या लेखन कार्याविषयी अनेक लेखक, समीक्षक, कवि यांनी मुक्तकंठाने कवने केली व गायीली आहेत. साहित्य शिवारातील विचाराचा वारसा चालविणाऱ्यांना त्यांनी कन्या, पुत्र मानले. खांदेशाची वाघीण म्हणून जिची ओळख आहे अशा जिजाताई राठोड चाळीसगाव ,यांना विचारपुत्री मानले. गोर गायिका शाहिन शेख पुसद, हिला मानसकन्या व विदर्भातील ख्यातनाम कवि उभरता शुक्रतारा कवि सुरेश राठोड काटोल  नागपूर आणि डाॅ. रविंद्र राठोड नागपूर यांना विचारपुत्र मानले. कवि सुरेश राठोड यांनी आपल्या वेग वेगळ्या ग्रामीण व शेती बांधावरील कविता नावारूपास आणल्या आहेत. त्यांनी एक स्वतंत्र कविता संग्रह आदरणीय भीमणीपुत्र काकाजींच्या जीवन कार्यास चरित्रात्मक रूपाने " गेय संवाद "  या नावाने समर्पित केले आहे. 
              या गोर भाषाशास्त्रज्ञ शिलेदाराचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यांच्यावर सदैव आर्द्र स्नेह करणारी मंडळी एकत्र येऊन त्यांच्या स्तुतीपर कवित्व करून " जग मोतीया " नावाचे कविता संग्रह प्रकाशित केले. या संपूर्ण कवितांचे संपादन विदर्भ सुरमणी कविवर्य सुरेश राठोड यांनी केले आहे. 
              काकाजींच्या साहित्याचा वारसा सदोदित बहरत रहावा, चालत रहावा म्हणून त्यांच्या संपूर्ण साहित्य विश्वाचा खजिना त्यांनी चिरंजीव ॲड. चेतन राठोड व बंधुपुत्र अमोल राठोड यांच्या हाती सुपूर्द केले आहे. आज अमोल वेग वेगळ्या कविता, वैचारिक लेख वाचका पुढे आणून साहित्य विश्वात आपले पाय रोवत आहे. 
              या जाज्वल्यमान, विद्रोही ,प्रतिभासंपन्न लेखकांच्या समवेत 2017 साली त्यांच्या हस्ते माझा नवोदित लेखक म्हणून गौरव करण्यात आला. सारखाणी ता. किनवट येथे अखिल भारतीय लेंगी महोत्सवाचे आयोजन सारखाणी येथील धडाडीचे नेते श्री. विशाल जाधव यांनी केले होते. तेथे भीमणीपुत्र काकाजी मुख्य सत्कारमूर्ती व अतिथि म्हणून उपस्थित होते. त्या प्रसंगी माझ्या विषयी काढलेले उदगार," वसंत भाऊराव राठोड, हा नवोदित लेखक झुंजार लेखणी हाती घेऊन उभा आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. " त्यांच्या मुखवदनातून निघालेले गौरवोदगार आजही कित्येक पटीने शाबासकीची थाप देत असतात. 
              ऐतिहासिक क्रांती दिवस दि. 09/08/2020 , रविवार रोजी आदरणीय काकाजी भीमणीपुत्र  यांची दोन पुस्तके, " लावण पिवसी " व ॲड. चेतन नाईक संपादित " वाते मुंगा  मोलारी " भाग दोन  तसेच कवि सुरेश मंगुजी राठोड लिखित " गेय संवाद " या तिनही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मज पामराच्या शुभहस्ते झाला .आज याचा मला सार्थ अभिमान होतो आहे. काकाजींनी व सन्मानीय आयोजकांनी  ही अवजड धुरा माझ्या हाती सोपविली होती. त्यांनी मला त्या योग्यतेचं मानलं ,या दाखविलेल्या मनाच्या थोरपणा बद्दल मी सतशः त्यांच्या रूणानुबंधात राहिन. आदरणीय ,काकाजी भीमणीपुत्र यांची लेखणी दिवसेंदिवस बहरत राहो , त्यांना दीर्घकालीन आयुरारोग्य लाभो ही मनस्वी सदिच्छा व्यक्त करतो व आज त्यांच्या जन्म दिना प्रीत्यर्थ सहृदय अभीष्टचिंतन करतो नी थांबतो 🌹👏 !
*****************************************
शब्दांकन : डॉ. वसंत भा.राठोड,मांडवी किनवट.
मो.नं. : 9420315409, 8411919665.
Mail ID: rathodvasant863@gmail.com 
*****************************************

भिमणीपुत्र

*"गोर साहीत्येर केसुला"....गोरगनेम याडीबोलीर अस्मीता पेरेवाळो प्रवर्तक-संस्थापक बापू भीमनीपुत्र**✍️

याडीबोली गौरवेसार बापूर वाटेप चालेर नी अनुकरंन करेर काळेर गरज🙏

         गोर याडीबोलीर प्रतीनीधीत्व करेवाळो शब्दप्रभू , सांप्रतारवस्थामाईर याडीबोलीर प्रवाहमय नी आपंन सेन हयातीम लाभोवियो सौभाग्यमय गोरविद्यापीठ मोहन गणूजी नाईक अर्थात गोरूर साहीत्य कोहीनूर आपनो पुज्यनीय भीमनीपुत्र बापू...! बापू केसुलारूपी गोरमनेती याडी सगळती कंन बापून सकेती रकाडंन उदंड आयुष्यारोग्य लाभंनो ई आरदास...! परभातीतीच शुभेच्छा शब्देम बापूर जीवनपटेर उलगडा वेगवेगळे स्वरूपेम वेतोगो. डॉ.वसंत राठोड सरेर मराठीप्रभुत्व शब्दांकन वाचनीय रं, मध्यांतरेन डॉ.दिनेश राठोड भीयार बापू संदर्भेमाईर उत्कृष्ट हिंदी साहित्य संपदार अवाका आकलनेसह कळेम आयो...! सासीच समाजेमाई व्यासंगी नी श्रेष्ठत्तम  शब्दप्रभूर अनुभूती ये निमीत्येती कळेम आयी. बापूर लकनीर वजाळेती अनेक गोरबुध्दीजीवी प्रभावीत छं, पंन ईच लकनो जतरा दर्जात्मक मराठी,हिंदीम रं वोतराच आपंन याडीबोलीम वेजातो तो आजेर दंनेर फलीत वेजातो हानू प्रांजळ मनेन वाटरोचं..! आपंन प्रयत्न करंन लकसकानी की याडीभाषाम लकेर प्रयत्नच करांनी..? ई भी वाटरोतो..! वयोनुरूप हामा सरीक समाजोभीमूख अध्ययन काळेर अध्ययनार्थी तो पामर छा..आसी अनुभवजन्य वातेर विवेचन करेन..जसो आब ये लेखेमाईभी अस्सल गोरशब्देर अभाव दिकान पडरोवीयंच..! पंन प्रतीभासंपन्न गोरूम याडीबोलीर दर्जात्मक लेखनेर हातोटीर अभाव दिकान पडंचं. आजेर से लकनीम याडीबोलीमाईर लेखंन समृध्दीर नी दर्जात्मक याडीबोली लकनीर अभाव शब्देगणीक दिकान पडो..! येरेपेक्षा प्रतीभावाळ लोक आपंन प्रभुत्व आपंन व्यासंगी भाषामच लके..! जनां बापूर जीवनपटेती से सदगदीत वीदे..! गोरबोली गौरव दनेर यथार्थता दिकान पडी कोनी..! खरे अर्थेती बापू आजेर दंन समाधानेती फुलंन जावं आसे याडीबोलीमाईर लेखनेर वाट हामासरीक अध्ययनार्थीभी हुसेती देकरेते..! पंन ई आसा आसाच रेगी...आतंच आपंन विद्वत्ता व्यवहार्य जीवनेम मोठ तो घरेर अर्थेन खोट ठरगी ! जतरा लीदे वू से व्यावहारीक भाषामाईर विद्वत्तार प्रदर्शन करंचं..! वोत याडीभाषासार काई  दकान पडेनी..! ई वात पुर्वीती चालती आयीचं, हानूच आंग भी चालू रीयं..! 
           बापूर अभिष्ठचिंतन करेर आज पावन दन, जे आपन 'गोरबोली गोरव दन' करंन दि वर्षेती मनायेन लागगे..ई बापूर याडीभाषा अथांग साधनार सन्मान..! काळेनुरूप याडीभाषा गौरव दनेर व्याप्ती मोठ वेती जानो. याडीभाषान प्रमाण भाषार,घटनात्मक भाषा करंन दर्जा मळायेसार बापूर आयुष्य झिजतो चालोचं. ई प्रयत्न अविरत चालरोचं. याडीभाषार पुर्व लेखन संदर्भ शुन्यगत रेयेनंतरही बापू मुलभुत संशोधनात्मक लेखन करते रीदे..! जत फक्तं आंधारो रं वोत याडीभाषार स्वतंत्र संकल्पन तयार करंन संस्थात्मक स्वरूपेम वोनूर याडीभाषा संशोधन नी लेखन शुन्यवस्थाम सिध्द करनों ई सामान्य बाब छेनी..! ई युगंतर वात छं..! याडीभाषामाईर साधे साधे शब्देर बापू विश्लेषनेती महती सिध्द किदे...जे देकंन व्यक्तीनिष्ठ नि व्यवहार्य भाषाप्रभू  गोरबुध्दीजीवीनंही आप्रृप रं..! ई याडीभाषा सिध्दता दिकाळेर प्राथमीक कीम बापू किदे..! कदाचीत स्वभाषा महतीर संपन्नता बापू दर्शाते कोनीतो स्वभाषार जाणीवताही मोडेम चलजाती. आंधारी रातेम काजवा वजाळो ढूंडू करंचं, स्वत:रेम पेटेमच सुगंधेर अत्तर रेयेनंतरभी पुरो जंगल हिरण्यमृग जंगल जंगल वोर शोध लेयेम हिंडू करचं....ये काजवा, नी हिरण्यमृगे सरीकंच स्थिती गोरगन समाजेर वेतानी छं..! 'स्व' भाषा आतरा संपन्न रेयेनंतरभी आपंन परभाषार आसरो लेतानी जगरेचा..! परभाषार चादर आपंन ओढंन बचरेचा की गमारेचा ईभी आपनेन कळेम आरोकोनी..!......क्रमश: (लकोलकाय टाईप करेन वेळ लागरोचं....बाकी सवार)

नाईक साहेबेरो गुन्हो कांयी ?*

*महानायक वसंतराव नाईक साहेबेर अप्रतिष्ठा करेवाळ लोकुपर सामाजिक बहिष्कार का न नाकेन चाये ?*    - फुलसिंग जाधव, छत्रपती संभाजीनगर ============...